Home ताज्या बातम्या जनतेच्या मनात कोरोनाचा टेरर, नेतेच ठरत आहेत सुपर स्प्रेडर

जनतेच्या मनात कोरोनाचा टेरर, नेतेच ठरत आहेत सुपर स्प्रेडर

162
0
कोरोना काळातही घेण्यात येणारे राजकीय मेळावे आणि त्यातून वाढणारी कोरोना रुग्णसंख्या

राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल लागल्यानंतर त्यावर प्रतिबंधात्मक निर्बंध लावून कोरोनाला थोपवण्याची सुरुवात झाली. मात्र हे निर्बंध नेमके कोणाला ? हा सामान्यांना पडलेला प्रश्न आहे. राजकीय पुढारी हे जनतेचे सेवक असले तरी जनतेच्या हितासाठी स्वत:वर निर्बंध लावण्याकडे त्यांचा कानाडोळा झालेला दिसतोय.

गर्दी टाळ्यासाठी सरकारने केलेले नियम राजकीय पुढारीच पाळताना दिसत नाहीत. राज्यात सर्रास स्थानिक पुढारी आपल्या विभागातील अनेक सार्वजनिक, सामाजिक, लग्न सोहळ्यांना उपस्थिती लावतात. मात्र यातून होणारा कोरोनाचा प्रसार किती धोकादायक ठरू शकतो याची कल्पना कोणीही करताना दिसत नाही.

राजकीय नेते हे अनेक लोकहिताची कामे करतात यात दुमत नाही. मात्र सध्या सुरू असलेली परिस्थितीचा आढावा घेतला तर कोणाचा पक्षप्रवेश असो वा लग्न, राजकीय पुढाऱ्यांसाठी सर्वकाही माफ असल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. अशाच काहीशा कार्यक्रमातून गर्दी झाल्यानंतर त्यात राज्यातील १० मंत्री आणि २० आमदार संक्रमित झाल्याची माहीती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

 

यातच आता माजी मंत्री पंकजा मुंडे, खासदार अरविंद सावंत, आमदार अतुल भातखळकर, आमदार रोहीत पवार यांचीही भर पडल्याचे समजते. आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून त्यांनी याची माहीती जनतेला दिली. मात्र दुर्दैवाने या संक्रमाणाचा फटका त्यांनी उपस्थिती लावलेल्या कार्यक्रमातील लोकांनाही बसू शकतो. यातूनच रुग्णसंख्येत वाढ होताना आपल्याला दिसते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.

राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्येचा लग्नसोहळा अगदी धुमधड्यात पार पडला. या लग्नसोहळ्याला राज्यातील अनेक मंत्री, आमदार आणि नामांकित व्यक्तींची उपस्थिती होती. या कार्यक्रमानंतर खुद्द हर्षवर्धन पाटील आणि त्यांची मुलगी कोरोनाबाधित झाले.

 

 

यादरम्यान राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सुप्रिया सुळे व त्यांचे कुटुंबीय कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. इतकेच नाही तर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनाही आपल्या राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहताना कोरोना निर्बंधांचा विसर पडल्याचे दिसले आहे. स्टेजवर गर्दी असतानाही त्यांनी मास्क काढून ठेवला. त्यामुळे कोरोना निर्बंध हे केवळ सामान्य जनतेसाठी असतात का? राजकीय पुढाऱ्यांना याचे गांभीर्य कधी कळणार हा प्रश्न सामान्य जनता विचारू लागली आहे.

Previous articleतयार रहा, आता ‘फ्लुरोना’ येतोय !
Next article‘बुल्ली बाई’ प्रकरणमागील मास्टरमाईंड निघाली उत्तरखंडातील महिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here