Home राजकारण संदीप देशपांडे यांच्या अटकेवरुन राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

संदीप देशपांडे यांच्या अटकेवरुन राज ठाकरेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना खरमरीत पत्र

248
0
Raj Thackeray and Uddhav Thackeray
प्रातिनिधिक छायाचित्र

राज्यात ४ मे पासून मशिदीवरील भोंग्यावर अजाण वाजली, तर त्यासमोर स्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याचे आवाहन मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी केले होते. त्यानंतर पोलिस विभागाकडून मनसे पदाधिकाऱ्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या. अनेक ठिकाणी पदाधिकाऱ्यांना अटक झाली. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनाही अटक करण्यासाठी प्रक्रिया सुरु असताना राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक खरमरीत पत्र लिहिले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटरवर सदर पत्र पोस्ट केले आहे. यात त्यांनी राज्य सरकारला खरमरीत इशारा दिला आहे. “राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे; आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत- जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही. उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!”

Previous articleयेत्या पाच दिवसात आणखी वाढणार उन्हाचा कहर, हवामान विभागामार्फत महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट जारी
Next articleकोकणाला मगरी ठरल्या वरदान, रत्नागिरीत ‘क्रोकोडाईल सफारीतून’ रोजगारनिमिर्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here