कोविड १९ हा विषाणू प्रयोगशाळेत बनवलेला आहे आणि तो उपग्रहीय उपकरणांद्वारे नियंत्रित केला जात असावा अशी कॉन्स्पिरसी थिअरी निवृत्त वरिष्ठ पोलिस अधिकारी धनराज वंजारी यांनी मांडली आहे. जैवयुद्धातील एक आयुध म्हणून कोविड-१९ विषाणू वापरला जात आहे असा त्यांचा आरोप आहे. जगातील अधिक लोकसंख्येचे जे देश आहेत त्यांच्या अर्थव्यवस्थेला खाली आणून शिवाय लोकसंख्या नियंत्रित आणण्यासाठी काही लोकांनी हा विषाणू पेरलेला असू शकतो अशी शक्यता वंजारी मांडतात.
यासंदर्भात वंजारी पुढे सांगतात… मी २००८ सालापासून बायोटेररिझम या विषयावर राज्यभर लेक्चर्स देत आहे. बायो-टेररिझमचा उद्देश बिझनेस जगतात दहशत माजवणं हा असतो. शिवाय जगातील माणसं कमी व्हावी व रिसोर्सेसवरचा बोजा कमी करावा हाही उद्देश त्यामागे असतो. जगभर मजूर वर्ग नाहिसा होत आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे प्रत्यक्ष मजुरीकाम कमी झालं आहे. त्यामुळे दुर्बल अनावश्यक मनुष्यबळ स्वस्तात मारणं यासाठी कोरोना हे बेस्ट वेपन आहे.
कोरोना किल्स वुइथ सायकॉलॉजिकल ट्रॉमा. या रोगात डेथ ड्यू टु शॉक असतो. हा फोरेन्सिकमधला कन्सेप्ट आहे. मी माझ्या कारकीर्दीत हजारो मृत व्यक्तींची मेडिकल सर्टिफिकेट बघितली आहे. त्यात १७ नंबरचा कॉलम असतो. त्यात नेहमीच लिहिलेलं असतं की डेथ ड्यू टू शॉक. म्हणजे बंदुकीची गोळी लागो किंवा तलवारीचे वार होवोत किंवा इतर कुठलही कारण असो. धक्क्यामुळे मृत्यू होतो. कोरोना महामारीने शॉक आधीच निर्माण झालेला आहे. आणि ही शॉक वेव्ह एवढ्या मोठ्या प्रमाणावर निर्माण केली गेली की आता जर आपण म्हणालो की कोरोनाची तिसरी लाट येते आहे तर त्या झटक्यानेच लोक रुग्णशय्येवर खिळायला सुरुवात होईल.
मरणाऱ्या लोकांमध्ये सर्वसाधारण निम्न मध्यमवर्गीय किंवा बिलो पॉवर्टी लाइन किंवा मग ज्यांना मधुमेह, ब्लडप्रेशर आदी व्याधी आहेत असे लोक मोठ्या संख्येने आहेत. जे धनदांडगे आहेत त्यांना उपचार मिळत आहेत. हॉस्पिटलच्या पायऱ्यांवर तडफडून माणसं मरताना आपण पाहतो आहोत. अर्थव्यवस्थेचे ध्रुवीकरण करून सर्व संससाधने मोजक्या लोकांच्या हातात ठेवायचे ही नीती अंमलात आणली जात आहे. हे षडयंत्र कोरोनामुळे पूर्ण होताना दिसत आहे.
इति श्री. धनराज वंजारी.